शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवकाची सागरी परिक्रमा--लोकमत विशेष--अभिषेक नार्वेकरकडून विक्रम : ६७८० किलोमीटरचा नऊ राज्यातून सागरी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:21 IST

आंबोली : आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन विक्रम केला आहे.

ठळक मुद्देशेवटचा समुद्रकिनारा पश्चिम बंगाल येथे सायकलने पार केला व मोहीम फत्ते मनाली ते श्रीनगर हा १०६५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला

महादेव भिसे ।आंबोली : आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन विक्रम केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग परिक्रमा त्याने सायकलने पार केली. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनारा जवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला.दिव, दमण, पाँडेचेरी, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमधून त्याने प्रवास केला. यावेळी त्याला तब्बल तीन हजार किलोमीटर प्रवासामध्ये वादळ, वारा, पाऊस यांचा सामना करावा लागला. तरीही न डगमगता अभिषेकने हा टप्पा पार केला.

अभिषेक हा सावंतवाडी येथील आपले शिक्षण पूर्ण करून सध्या पुणे येथील एका पर्यटनाशी निगडित असलेल्या कंपनीमध्ये काम करतो. हे काम करत असताना त्याने यापूर्वीही मनाली ते श्रीनगर हा १०६५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक मोहिमा करण्याचे उद्दिष्ट त्याने डोळ्यासमोर ठेवले होते. त्यात या सागरी परिक्रमेचा समावेश होता. यापूर्वी अशा प्रकारची कोणीही केली नसल्याने त्याने ही मोहीम करण्याचे ठरवले. व ती बहात्तर दिवसांत पूर्णत्वासही नेली.यात अभिषेकने अथक परिश्रम घेतले व खडतर प्रवासातून ही मोहीम पूर्ण केली. त्याने रोज पस्तीस किलोमीटर सायकल चालवून सरावही केला होता.

७ सप्टेंबरला लखपत गुजरात येथून सुरू करून शंभर किलोमीटर सायकल चालवत त्याने हा टप्पा पार केला. त्याने शेवटचा समुद्रकिनारा पश्चिम बंगाल येथे सायकलने पार केला व मोहीम फत्ते केली. अभिषेकच्या या प्रवासाबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.आठवण म्हणून वाळू आणलीखराब रस्ते, खराब हवामान या सर्वांवर मात करत अभिषेकने ही मोहीम यशस्वीरीत्या पार केली. स्वच्छतेचा संदेश देत अभिषेक ज्या ठिकाणी गेला त्या प्रत्येक ठिकाणी अभिषेकचे मनापासून स्वागत करण्यात आले.तर अभिषेकने या मोहिमेची आठवण म्हणून त्याने ९ राज्यातील प्रत्येक समुद्र किनाºयावरील वाळू आठवण म्हणून सोबत आणली.यावेळी अभिषेकने सांगितले की, या पुढील मोहीम ही संपूर्ण युरोप सायकलने फिरण्याची इच्छा आहे. अभिषेकने केलेल्या कामगिरीचे सिंधुदुर्गातून तसेच महाराष्ट्रभरातून कौतुक होत असून सिंधुदुर्गवासीयांनी त्याचे स्वागत करत पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.